वर्धा नदीवर तोल गेल्याने पुलावरून पडून युवकाचा मृत्यू
#धानोरा जवळील घटना#
राजुरा,चंद्रपूर(संतोष कुंदोजवार)-
विरुर स्टेशन येथून धानोरा मार्गे आर्वी कडे दुचाकीने जात असताना वर्धा नदीच्या पुलावर तोल गेल्याने पुलाचे पिल्लरला धडक देत पुलाखाली पडून अपघात झाल्याने परप्रांतीय मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडे बारा वाजे दरम्यान घडली,जितेंद्र कानासे वय 21 वर्ष राहणार टिकरी,मध्यप्रदेश असे मृतकाचे नाव आहे
गोंडपीपरी येथे रस्ता कामावर मिक्सर आपरेटर म्हणून कार्यरत असलेले जितेंद्र कानासे हा काही कामानिमित्त विरुर येथून धानोरा मार्गे गोंडपीपरी ला जात होता दरम्यान धानोरा जवळील वर्धा नदी वरील पुलावरून जात असताना दुचाकीस्वाराचा तोल गेला आणि पुलाचे पिल्लरला धडक देत 40 फूट खोल नदीचे पात्रात पडला या अपघात त्याचा मृत्यू झाला
माहिती मिळताच विरुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार कृष्णा तिवारी,उपनिरीक्षक सदानंद वडतकर,आणि पोलीस बंडू कुमरे,देवाजी टेकाम,स्वप्नील,आणि अशोक घटनास्थळी पोहचून पुढील कारवाई केली.
प्रतिकार न्यूज